शनिवार, १७ डिसेंबर, २०११

कार्यकर्त्याचा विकास

कार्यकर्त्याचा विकास
आयुर्वेद व्यासपीठ अभ्यासवर्ग
सांगली 27.5.01

आधीच्या सत्रांमध्ये विविध जिल्ह्यातील कार्यवृत्त आपण ऐकले, त्यातून व्यासपिठाच्या विविध उपक्रमांची व संघटनेच्या विस्ताराची कल्पना आपल्याला आली असेल. शास्त्रचर्चेच्या सत्रातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असतील. व्यासपिठाच्या सर्व उपक्रमांमध्ये अभ्यासवर्गाचे स्थान वैशिष्ठ्यपूर्ण आहे. अन्य उपक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांची योजना आपण करतो. पण संघटना ज्या विचारांवर अधिष्ठीत आहे, त्या विचारप्रणालीचा व ही विचारप्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी स्विकारलेल्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासवर्गात होते.
पुष्कळदा कार्यक्रमांच्या घाइगर्दीत ज्या उद्दिष्टांसाठी काम करतो आहोत, त्यांचा विचार करायला वेळ मिळत नाही व मग कार्यक्रम भरपूर व प्रभावी झाले तरी काम दिशाहीन होते. कधीकधी उद्दिष्टांचा, ध्येयधोरणांचा विचार खूप होतो, पण त्या प्रक्रियेत कामाची गती मंदावते. संघटनेचे काम व्यवस्थित चालण्यासाठी दिशा आणि गती दोन्हीत संतुलन आवश्यक आहे.
अभ्यासवर्गात आपण आपल्या संघटनेच्या निर्मिती मागची पार्श्वभूमी, उद्दिष्टे, ध्येयधोरणे व कार्यपद्धती समजाऊन घेतो, त्याची उजळणी करतो. उजळणी साठी इंग्रजीत Revision शब्द आहे, एकाने त्याचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे; Revision gives you a new vision आपल्या संस्कृतीत पारायण शब्द आहे, त्यामागे हाच दृष्टीकोन आहे.
संघटनेच्या कामाचा आधार असतो कार्यकर्ता, संघटनेची चेतनाशक्ती असतो कार्यकर्ता. कार्यकर्त्याच्या क्षमतेनुसार, कल्पकतेनुसार काम उभे राहाते, अर्थात कार्यकर्त्याच्या क्षमता व कल्पकते सारखेच त्याच्या मर्यादांचे व गुणदोषांचेही परिणाम कामात उमटतात. विवेकानंद शीलास्मारक व केंद्राचे शिल्पकार मा. एकनाथजी रानडे असे म्हणत असत की कार्यकर्त्याकडे पाहिले की कार्यक्षेत्रातल्या त्याच्या कामाची कल्पना करता येऊ शकते व एखाद्या कार्यक्षेत्रातले काम बघितले की त्यावरून कार्यकर्त्याची कल्पना करता येऊ शकते. कार्यकर्ता हा त्याच्या कार्यक्षेत्रापुरता त्या संघटनेचे प्रतीक असतो, साकार रूप असतो. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्याच्या व्यवहारानुसार, गुणवत्तेनुसार स्थानिक लोकांच्या संघटनेविषयी धारणा तयार होतात. कम्युनिस्ट रशियाचा पहिला राष्ट्रप्रमुख लेनिन याला अशी सवय होती की देशातला सामान्य कामगार, शेतकर्या.ला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी तो अचानक एखाद्या सामान्य कामगार, शेतकर्यारच्या झोपडीत जाऊन त्याच्याशी गप्पा मारायचा. एकदा अशाच गप्पा झाल्यावर तो शेतकरी त्याला म्हणाला ‘काय गंमत आहे पाहा, तुमचे नाव लेनिन आहे आणि देशाच्या प्रमुखाचे नावही लेनिन आहे. तो तुमच्याइतका चांगला असता तर किती बर झाल असत ?’
म्हणून संघटनेच्या उपक्रमात कार्यकर्त्याचा विकास हा महत्वाचा भाग असतो. विकासाचा उपक्रम म्हणून काही स्वतंत्र उपक्रम नसतो, तर छोट्यामोठ्या कार्यक्रमातून, बैठकांमधून, अभ्यासवर्गातून व सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनौपचारिक गप्पा, चर्चा व जेष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासातून ही विकासाची जडणघडण होत असते. पण एक कार्यकर्ता म्हणून आपणही यासाठी सातत्याने व सक्रीय प्रयत्न करायला हवे. ज्याप्रमाणे व्यक्तिगत जीवनात एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंबप्रमुख म्हणून, एक वैद्य म्हणून आपली प्रगती व्हावी, उत्कर्ष व्हावा अशी महत्वाकांक्षा ठेवतो, त्यासाठी धडपड करतो, कष्ट करतो, जे अगदी स्वाभाविक व उचितच आहे, त्याचप्रमाणे एक कार्यकर्ता म्हणूनही माझी प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे यासाठी पण धडपड, कष्ट केले पाहिजे. आपली क्षमता, गुणवत्ता व कार्यकुशलता वाढली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे.
संघटनेचे काम करतांना सगळ्यात पहिले उद्दिष्ट म्हणजे संघटना अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवणे. हे पोहोचवण्याचे काम होते संपर्कातून, भेटीगाठीतून. या भेटीगाठींमुळे नव्यानव्या व्यक्ती संघटनेशी जोडल्या जातात, त्यातून शक्तीसंचय होतो. हा शक्तीसंचय अंकगणिताप्रमाणे Arithmetic progression(5+5=10) न होता भूमितीय पद्धतीने Geometric progression (5x5=25) होतो. या संपर्काचा आधार आत्मियता असला पाहिजे.
To meet is to know
To know is to understand
And to understand is to love
म्हणून भेटीगाठींसाठी वेळ दिला पाहिजे. त्यातही या भेटीगाठी प्रत्येकवेळा कामासाठी, कामापुरत्या नको. सहज, अनौपचारिक भेटीतून जे संबंध निर्माण होतात ते अधिक मजबूत असतात.
संपर्कातून, नव्यानव्या व्यक्ती संघटनेशी जोडल्या जातात, पण संघटनेशी त्यांचे नाते जडते ते संस्कारांमुळे. असे संस्कार भाषणाने होत नाहीत, ते होतात व्यवहारातल्या प्रत्यक्ष अनुभवाने, कार्यकर्त्यांच्या वागण्याने. केरळमध्ये संघाचे काम प्रभावी होत होते, त्यामुळे कम्युनिस्ट अस्वस्थ झाले, त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला संघाच्या कामाचे रहस्य शोधून काढण्यासाठी शाखेत जायला सांगितले. वेळोवेळी ते त्याला त्याबद्दल विचारत, त्याला काहीच सांगता येत नसे, होताहोता त्याचा साम्यवादावरचा विश्वास उडाला व संघातील अनौपचारिक, आत्मियतापूर्ण वातावरणामुळे तो संघाशी जोडल्या गेला व संघाचा प्रचारक झाला.
संघटनेच्या निकोप वाढीसाठी ते काम कार्यकर्त्यांच्या संचाच्या प्रयत्नातून Teamwork उभे राहाणे आवश्यक असते. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नंतर एका भेटीत भारतीय अंतरिक्ष विज्ञानाचे प्रवर्तक श्री विक्रम साराभाईंनी त्याला त्याच्या यशाचे रहस्य विचारले. त्याने उत्तर दिले की चंद्रावर पाय ठेवणारा मी एकटा असलो तरी त्याच्या पाठीमागे पृथ्वीवर काम करणार्याा हजारो लोकांचे नियोजनबद्ध, मन:पूर्वक व अचुक सामुहिक परिश्रम होते.
सामुहिक प्रयत्नांइतकेच महत्व वाट्याला येईल ते काम आनंदाने स्विकारण्याला व मन:पूर्वक पार पाडण्याला आहे. संघटनेने सोपवलेले कुठलेही काम छोटे किंवा हलके न मानता ते तितक्याच तळमळीने करणे आवश्यक असते. 1916 च्या हिवाळ्यात कॉंग्रेसचे अधिवेशन लखनौला होते, लखनौला त्यावेळी कडाक्याची थंडी होती. पहाटे बाहेर गावाहून येणार्यास प्रतिनिधींना असे दिसले की कोणीतरी चुलीवर पाणी गरम करतो आहे, जवळ गेल्यावर लक्षात आले की ते लोकमान्य टिळक होते. बाहेरून येणार्याी माझ्या कार्यकर्त्यांना लखनौच्या थंडीची सवय नाही, त्यांच्यासाठी गरम पाणी आवश्यक आहे, ही तळमळ त्यामागे होती. राजसूय यज्ञात महाराज युधिष्ठीर कामे वाटून देत असतांना भगवान श्रीकृष्णांनी स्वत:कडे उष्ट्या पत्रावळी गोळा करण्याचे काम घेतले होते.
कार्यकर्त्याच्या विकासात अनुशासनालाही फार महत्व आहे. एका पंक्तीमध्ये संघाचे सरसंघचालक श्रीगुरूजीही भोजनासाठी बसले होते, व्यवस्थेमध्ये असलेल्या कार्यकर्त्याला वाटले की भोजन संपल्यावर सगळे एकदमच उठले तर श्रीगुरूजींना बाहेर पडायला अडचण होईल, म्हणून त्याने सूचना दिली की कोणीही स्वयंसेवक जागेवरून उठणार नाही व श्रीगुरूजींना उठण्यासाठी विनंती केली. श्रीगुरूजी त्याला म्हणाले ‘अरे मी पण एक स्वयंसेवक आहे, तूच सूचना दिली आहेस की ‘कोणीही स्वयंसेवक जागेवरून उठणार नाही’, मी पण जागेवरून उठणार नाही’, व्यवस्थेतल्या कार्यकर्त्याला आपली चूक लक्षात आली, त्याने सूचना दिली की सगळे उठू शकतात. संघाच्या सर्वोच्च पदावर असूनही ‘मी एक स्वयंसेवक आहे, व स्वयंसेवकासाठी असणारे नियम मलाही लागू आहेत’ ही श्रीगुरूजींची धारणा होती.
कार्यकर्त्यावर सोपवलेले काम नीट पार पाडता येण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या कामातली कुशलता आत्मसात करावी लागते. एखाद्या कामाचे, कार्यक्रमाचे नियोजन करणे, पूर्वतयारी करणे, प्रत्यक्ष कार्यक्रमाचे संचालन करणे, पाठपुरावा करणे अशी विविध प्रकारची कामे करण्यासाठी अभ्यास व अनुभवातून कौशल्य संपादन करावे लागते. त्यासाठी जागरुक राहून प्रयत्न करावे लागतात. अ. भा. विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. यशवंतराव केळकर एका कार्यक्रमात बोलत असतांना श्रोत्यांमध्ये बसलेले जेष्ठ पत्रकार श्री. पा.वा. गाडगीळ टिपण काढत होते. नंतर यशवंतराव त्यांना म्हणाले ‘माझ्या व्याख्यानाची टिपणे कशासाठी’? त्यावर पा.वा. गाडगीळ म्हणाले ‘प्रत्येकाच्याच बोलण्यातून काही ना काही शिकण्यासारखे असतेच’. बोलण्यात नेमकेपणा हवा. संघाचे एक जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते मा. श्री. मोरोपंत पिंगळे यांच्याबद्दल बोलतांना मा. प्रल्हादजी अभ्यंकर म्हणाले होते, ‘बरेचदा लोक बोलतात खूप, पण सांगत काहीच नाहीत, मोरोपंत बोलले थोडे, पण त्यांनी सांगिपले खूप’. इंग्लंडचे एकेकाळी पंतप्रधान असलेले व चतुरस्त्र व्यक्तीमत्व असलेले श्री. विंस्टन चर्चिल यांना एकदा प्रश्न विचारल्या गेला ‘एखाद्या विषयावर एक तास बोलण्यासाठी किती वेळ पूर्वतयारीला लागेल?’ चर्चिल म्हणाले ‘एक दिवस’. मग विचातल्या गेले ’ पंधरा मिनिटे बोलण्यासाठी?’ चर्चिल म्हणाले ‘पंधरा दिवस’.
काम करतांना प्रचंड चिकाटीची गरज असते. माकडाच्या गोष्टीतल्यासारखे कोय रुजली की नाही ते रोज उकरून पाहिले तर कोय कधीच रुजणार नाही. गर्भाच्या निकोप व सुरळित वाढीसाठी जसा गर्भधारणेचा निश्चित कालावधी असतो, तद्वतच प्रत्येक कार्यकर्त्याच्या, संघटनेच्या विकासासाठी एक Period of gestation’ असतो, तोपर्यंत चिकाटीने प्रतिक्षा करावी लागते. घाई केली तर abortion किंवा premature delivery होण्याची शक्यता असते. वैकुंठ मार्गावर निघालेल्या नारदांना तप करणार्या एका ऋषींनी चित्रगुप्ताकडे चौकशी करायला सांगितले ‘मोक्ष मिळण्यासाठी अजून किती दिवस तप करावे लागेल?’ नारद पुढे गेल्यावर दुसर्याय एका ऋषींनीही चित्रगुप्ताकडे अशीच चौकशी करायला सांगितले. काही दिवसांनी नारद परतले. दुसरे ऋषी त्यांना आधी भेटले, त्यांना ते म्हणाले ‘चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार तुम्हाला अजून चाळीस वर्षे तप करावे लागेल’ हे ऐकून त्या ऋषींनी उद्वेगाने कपाळावर हात मारला. पुढे नारदांना पहिले ऋषी भेटले, त्यांना नारद म्हणाले ‘चित्रगुप्ताच्या नोंदीनुसार तुम्हाला अजून, ज्या झाडाखाली तुम्ही तप करीत आहात, त्या झाडाला जितकी पाने आहेत तितकी वर्षे तप करावे लागेल’ हे ऐकून त्या ऋषींनी आनंदाने नाचायला सुरूवात केली, नारदांनी त्यांना आश्चर्याने विचारले ‘निराशेऐवजी तुम्हाला आनंद कसा झाला?’ ते ऋषी म्हणाले ‘झाडाला पाने खूप आहेत, पण असंख्य तर नाहीत. इतक्या वर्षानंतर का होइना पण मोक्ष नक्की मिळणार ही परमानंदाची गोष्ट आहे’ कथेत पुढे असे सांगितले आहे की आनंदाने नाचतानाचताच त्यांना मोक्षप्राप्ती झाली.
स्थायी स्वरुपात काम उभे राहाण्यासाठी कामात सातत्याची गरज असते. श्रीरामकृष्ण परमहंसांना एकदा एकाने प्रश्न विचारला की आपण असे मानतो की गंगेत स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात, पण व्यवहारात असे दिसते की रोज लाखो व्यक्ती गंगेत स्नान करतात पण त्यांच्या जीवनात असे काही आढळत नाही, असे का? श्रीरामकृष्ण त्याला गमतीने म्हणाले, ‘गंगेच्या काठावर मोठे वृक्ष आहेत. जेव्हा लोक स्नानाला जातात तेंव्हा त्यांची पापे या वृक्षांवर जाऊन बसतात, आणि जेंव्हा लोक स्नान करून बाहेर येतात तेंव्हा त्यांची पापे परत त्यांच्या मानगुटीवर बसतात.’ त्यांच्या म्हणण्याचा उद्देश्य हा होता की एकदा पुण्यकर्म केले म्हणजे पाप नष्ट होणार नाही, त्यासाठी सातत्याने पुण्यकर्म करत राहाण्याची गरज आहे. मा. बाबा आमटे यांनी यशस्वी जीवनाची व्याख्या “Continuous creative activity” अशी केली आहे. म्हणजे सातत्याबरोबर रचनात्मकताही पाहिजे. भुकंपग्रस्त भागातील एका मुलाला काही दिवसांसाठी नातेवाइकांकडे पाठवण्यात आले, काही दिवसातच नातेवाइकांचा निरोप आला की मुलाला घेऊन जा, भुकंप इकडे पाठवला तरी चालेल. सातत्याने विध्वंसक कामात गुंतलेल्यांची संख्या कमी नाही, म्हणून सातत्याबरोबरच रचनात्मकताही हवी. पण सातत्याने रचनात्मक ‘चिंतन करणार्यांखची संख्याही कमी नाही, रविंद्र पिंगेनी बोनसाय कादंबरीत Intellectuals म्हणजे काय याचे वर्णन diarrhea of words and constipation of ideas असे केले आहे. म्हणून त्याला कार्यशीलतेची जोड हवी. यासाठी कार्यकर्त्याच्या जीवनात अखंड विधायक कामाचे दर्शन हवे.
प्रत्येकजण संघटनेशी कुठल्यानाकुठल्या निमित्ताने जोडल्या जातो, मग ती व्यक्ती असेल, एखादा कार्यक्रम असेल, एखादा प्रसंग असेल किंवा एखादा विचार असेल. पण हळूहळू कार्यकर्ता संघटनेच्या ध्येयाशी जोडल्या जायला हवा, आणि कामाची सुरूवात जरी कोणीतरी सांगितले म्हणून काम करण्याच्या प्रेरणेपासून झाली असली तरी हळूहळू त्याचे रुपांतर स्वत:हून स्विकारलेले, स्वत:हून करायचे ठरवलेले कार्य यात व्हायला हवे. श्री. विष्णूमहाराज पारनेरकरांनी काम आणि कार्य यातला फरक सांगतांना ‘काम म्हणजे कोणीतरी सांगितले म्हणून करतो ते आणि कार्य म्हणजे स्वत:हून करतो ते’ असे सांगितले आहे. यातून कर्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार संघाच्या सुरुवातिच्या काळात शाखा सुटल्यानंतर त्या वस्तीतल्या एखाद्या प्रतिष्ठिताच्या घरी जात व सोबतच्या कार्यकर्त्यांची ओळख करून देत, ‘हा नववीत शिकणारा बाळ देवरस, आमच्या शाखेचा कार्यवाह आहे’, ती प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टरांना चेष्ठेने म्हणत असे ‘काय डॉक्टर, या शेंबड्या मुलांना घेऊन तुम्ही हिंदूराष्ट्र घडवणार?’ पण डॉक्टरांचा जबर आत्मविश्वास कालांतराने खरा ठरला आणि नववीत शिकणारा बाळ देवरस एक दिवस संघाला राष्ट्रजीवनाच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवणारा संघाचा सर्वोच्च नेता बनला.एकदा कॉंग्रेसचे एक पुढारी संघाच्या कार्यकर्त्याला म्हणाले ‘गेले तीस दिवस तीस गावी टांगा घेऊन फिरतो आहे, पण एक माणूस हाताला लागेल तर शपथ !’ शेजारी उभा असलेला एक बाल स्वयंसेवक म्हणाला ‘लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण तीस दिवस तीस गावी फिरण्यापेक्षा एकाच गावी फिरला असतात तर काम झाले असते.’ मद्रासला संघाच्या कार्यालयात अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर जखमींना भेटायला रुग्णालयात तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता आल्या होत्या. एका जखमी मुलाला भेटतांना त्या म्हणाल्या ‘काही काळजी करू नकोस, तुमच्या संपूर्ण उपचाराची काळजी सरकार घेईल’, तो बाल स्वयंसेवक म्हणाला ‘ आमच्या उपचाराची काळजी घेण्यास संघ समर्थ आहे, तुम्ही अतिरेक्यांचा बदोबस्त करा.’
आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक असले तरी आत्मविश्वासाचे रुपांतर अहंकारात होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. जनसंघाच्या कार्यालयात एकदा संध्याकाळी एका कार्यकर्त्याला दीनदयाळजी उपाध्याय अंगणात शेकोटी पेटवतांना दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला दिसले की दीनदयाळजी त्यांची प्रमाणपत्रे शेकोटीत टाकीत आहेत. अतिशय कुशाग्र बुद्धीचे असल्याने दीनदयाळजींनी शालेय व महाविद्यालयीन परिक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण केल्या होत्या. त्या कार्यकर्त्याने आश्चर्याने दीनदयाळजींना या शेकोटीचे कारण विचारले, ते शांतपणे म्हणाले ‘माझे जीवन मे आता संघाला समर्पित केले आहे, या प्रमाणपत्रांची आता गरज काय?’ संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री. गुरूजी केरळमध्ये एका वैद्यराजांचे उपचार घेण्यासाठी गेले होते. तिथल्या प्रथेप्रमाणे वैद्यराज त्यांना म्हणाले ‘उपचारांच्या प्रारंभी आपण दोघे मिळून परमेश्वराची प्रार्थना करू की या उपचारात आम्हाला यश येऊ दे’ श्रीगुरूजी अतिशय विनम्रपणे त्यांना म्हणाले ‘आजपर्यंत मी परमेश्वराकडे स्वत:साठी काही मागितले नाही, व आताही मागणार नाही’ स्तंभित झालेले वैद्यराज उद्गारले ‘हा पुण्यात्मा आहे’
कार्य करतांना समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या अशा कार्यकर्त्यांचे स्मरण सतत असले पाहिजे. अशा कार्यकर्त्यांचे जीवन कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दातून आपल्याला उमजू शकेल...
‘पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती,
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे,
बांधु न शकले प्रितीचे वा किर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार’
ज्ञातअज्ञात अशा हजारो महापुरुषांचे आणि क्रांतिकारकांचे आत्मसमर्पण या समाजाच्या उत्थानासाठी झालेले आहे. कल्पवृक्षाखाली बसून केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण कशी होते या प्रश्नाचे उत्तर देतांना वशिष्ठ ऋषी म्हणाले की या वृक्षाखाली बसून असंख्य ऋषीमुनींनी खडतर तपश्चर्या केलेली आहे, त्या तपश्चर्येमुळे या वृक्षात हे सामर्थ्य निर्माण झाले आहे व या वृक्षाचा कल्पवृक्ष झाला आहे. समाजसंघटनेच्या कार्यात अशा शेकडो कार्यकर्त्यांनी अशीच तपश्चर्या केलेली आहे. संघटनेचे काम करतांना हे भान जागे असले म्हणजे कार्यकर्त्यांची पाऊले योग्य दिशेनेच पडतात.
काम करतांना संघटनेचे जीवितकार्य काय व आपल्यासमोरचे लक्ष्य काय याचे अवधान सतत असले पाहिजे. कधीही मैदानावर पाय न ठेवलेल्या एका माणसाने फुटबॉलच्या एका सामन्यात भाग घेतला. सामना संपल्यावर घरी पत्नीला तो सांगत होता ‘तासभर मैदानावर नुसता धावत होतो’ दमलेल्या पतीचे पाय चेपताचेपता पत्नीने कौतुकाने विचारले ‘मग किती गोल मारले तुम्ही?’ ‘गोल ?, अग या तासाभरात माझ्या पायाचा चेंडुला एकदाही स्पर्श झाला नाही’ पती उत्तरला ! कामाच्या धावपळीत आपलेही असे होत नाही ना याची दक्षता घेतली पाहिजे. या समाजाचे, राष्ट्राचे उत्थान हे आमचे लक्ष्य आहे. एक चिमुरडी मुलगी म्हणाली ‘मै उन्नत भारत ने जीना चाहती हू’ आणि अब्दुल कलामांचा भारताचा कायापालट करण्याचा संकल्प गतिमान झाला. आदर्श मानवी जीवनाची उभारणी हे भारतीय जीवनदर्शन आहे. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला, पण भारतीय संस्कृती टिकून आहे. म्हणूनच कवी इक्बाल म्हणतो
‘यूनान मिस्र रोमां सब मिट गए जहासें, कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी’
आज जगालाही याची जाणीव होते आहे. एकेकाळी जगातल्या सगळ्यात धनाढ्य व्यक्तीत गणना होणार्‍या प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांचा नातू आज हरे रामा हरे कृष्णा म्हणत विचारतो आहे ‘Wealth? Who’s wealth? All the wealth belongs to Lord Krishna.’ रशियाच्या एकेकाळच्या सर्वसत्ताधीश स्टॆलीनची मुलगी स्वेतलाना गंगाकिनारी एक झोपडी बांधून तिथेच अखेरचा श्वास घेण्यात धन्यता मानते. कारण जगातल्या यच्च्ययावत मानवांना त्यांच्या प्रकृतीनुरूप मुक्तीचे मार्ग उपलब्ध करून देणारी भारतीय संस्कृती हेच आज जगाचे आशास्थान आहे.
“ऋचिनां वैचित्र्याद् ऋजुकुटिल नाना पथजुषां, नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्ण इव’’
ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे आपापल्या रुचीप्रमाणे वाटचाल करणारे सर्वजण एकाच सत्त्याकडे जातात.’
आयुर्वेदाची ध्वजा खांद्यावर घेतलेल्या आम्हा सर्वांनाही वैद्यकक्षेत्रात ही भूमिका पार पाडायची आहे.
एतद्देश प्रसूतस्य सकाशाद्अग्रजन्मन:
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्या सर्वमानवा’
’या देशात जन्मलेले आम्ही सर्व आमच्या जीवनातून, पृथ्वीवरच्या सर्व मानवांना ज्ञान देऊ’ आयुर्वेदाचे एक नवे व्यापक, सर्वसमावेशक, आधुनिक, विजिगिषू रूप जगाला दाखवू.
समस्यांनी ग्रासलेल्या या देशात हे सामर्थ्य आहे. हिमाचल प्रदेशात पर्यटन करणार्या श्री. पुजारी यांना बारटोक या छोट्या खेड्यातल्या एका सामान्य चहाच्या टपरीवाल्याने एक कप चहा बिनसाखरेचा बनवला म्हणून साखरेचे पैसे परत दिले. हे या समाजाचे सामर्थ्य आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विध्वंसाचा आगडोंब उसळलेल्या पंजाब मध्ये विक्रमी धान्योत्पादन घेणारा शेतकरी हे या देशाचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या आधारावरच नव्या भारताचे स्वप्न साकार होणार आहे. If you can dream it, you can do it.
हे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता गाभार्‍या तील भारतमातेची प्रतिमा उजळवणारा नंदादीप बनला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा ठरवावी लागेल. ‘Most people are like falling leaf that drifts, turns, flutters and fall to the ground. Few others are like stars which travel a definite path. No wind reaches them. They have within themselves the path and the guide.’ Herman Hess in “Siddhartha”
आज संकटांनी वेढलेली भारतमाता तिच्या पुत्रांच्या पुरुषार्थाला आवाहन करते आहे, कवी म्हणतो
“शून्य तटोसे सर टकराकर, पूछ रही गंगाकी धारा,
सगरसुतोसेभी बढकर मृत, आज हुवा क्या भारत सारा.
यमुना रोती कहा कृष्ण है, शरयु कहती कहा राम है,
व्यथित गंडकी खोज रही है, चन्द्रगुप्त के धाम कहा है.
अर्जुन का गॉंडीव किधर है, कहा भीम की गदा खो गई,
किस कोने मे पॉंचजन्य है, कहा भीष्म की शक्ति सो गई.
कोटीकोटी पुत्रोकी माता, अब भी पीडित-अपमानित है,
जो जननि का दुख न मिटाये, उन पुत्रोपर लानत है.”
पण कार्यकर्त्यांनी हे आव्हान स्विकारले आहे, ते म्हणतात
“आखोमे वैभव के सपने, पगमे तुफानो की गति है,
राष्ट्र सिंधुका ज्वार न रुकता, आये जिसजिसकी हिम्मत हो.”

*** ** *

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: विविध आयाम व कार्यपद्धती

आयुर्वेद व्यासपीठ: विविध आयाम व कार्यपद्धती


संस्थात्मक कामाच्या दृष्टीने पदाधिकार्यांसच्या दायित्वाचे विवरण घटनेत असले तरीही संघटनेच्या संदर्भात, निरोगी वाटचालीच्या दृष्टीने निश्चित कार्यपद्धतीचा अंगिकार करणे उचित ठरावे. सखोल चिंतन, नेटके नियोजन व कार्यक्रमांची व्यवस्थित आखणी यासाठी कामाचे विविध पैलू, कार्यकारी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटून घ्यावे, या कार्यकर्त्यांनी, संस्थापक/आजीव/सहयोगी/निमंत्रित सभासदांमधील अन्य काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या, त्या विषयाचा अभ्यासगट तयार करावा व त्या विषयासंदर्भात ढोबळ आराखडा कार्यकारी मंडळासमोर विचारार्थ ठेवावा, मंडळाने सविस्तर सामुहिक चिंतनानंतर त्यावर निर्णय घ्यावा. ठरलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा संबंधित कार्यकर्त्यांनी अभ्यासगटाच्या मदतीने करावा, आकस्मिक निर्णयप्रसंगी प्रमुख पदाधिकार्यांीनी त्या विषयाशी संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावे, व लवकरात लवकर त्याची कल्पना कार्यकारी मंडाळाला द्यावी.

कार्यकारी मंडळासमोरील काही विषय
1.आजीव सदस्यांची नियुक्ती
2.निमंत्रित सदस्यांची यादी:अ) आयुर्वेद विश्वातील जेष्ठ व सन्माननीय व्यक्तींमधून
आ) संघप्रेरीत वैद्यकीय संघटना, संस्था व रुग्णालयांचे प्रतिनिधी उदा: वैद्यकीय
विद्यार्थी परिषद, एनएमओ, ग्राहक पंचायत वैद्यकीय विभाग, रक्तपेढ्या-
रुग्णालये व वैद्यकीय सेवा प्रकल्पांचे प्रतिनिधी
इ) वैद्यकीय पदवीधर नसलेल्या आयुर्वेद विश्वातील व्यक्तींमधून उदा: औषधी
निर्माते, संस्थाचालक, वनौषधींची लागवड करणारे, वनस्पतीशास्त्रज्ञ, प्रशासन
सेवेतील किंवा सेवानिवृत्त व्यक्ती

विविध आयाम व त्यानुसार विषयसूची

1.संघटन : संपर्क यंत्रणा, प्रवासाची योजना, विभाग, जिल्हा, नगर स्तरावर संघटनात्मक रचना. प्रांत, विभाग, जिल्हा स्तरावर
बैठका व अभ्यासवर्गांची योजना.
2.आर्थिक व्यवहार : प्रांत, विभाग व जिल्हा स्तरावर विविध स्वरूपातील निधीसंकलनासाठी निश्चित
धोरण.संस्थात्मक व संघटनात्मक कामासाठी झालेल्या जमाखर्चाचे विवरण नियमितपणे
प्रांताकडे पाठवणे.स्थानिक कर्यक्रम, उपक्रमांसाठी झालेल्या जमाखर्चाचे शेष राशीसह काटेकोर विवरण
प्रांताकडे पाठवणे.
व्यासपिठाच्या नावावर होणार्‍या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद प्रांत कार्यालयात
असणे आवश्यक.प्रांत, विभाग व जिल्हा स्तरावर जमाखर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
3.पदवीधर व व्यावसायिक सदस्य : पूर्ण पत्त्यांसह अद्ययावत सूची जिल्हा, विभाग व प्रांत
स्तरावर. व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी उपक्रम- व्याख्याने, परिसंवाद,
कार्यशाळा, शास्त्रचर्चासत्रे (Clinical meetings)
व्यावसायिक समस्या निराकरणासाठी प्रयत्न.ग्राहक संरक्षण कायद्याबाबत
मार्गदर्शन. शासकीय सेवेत उपलब्ध संधींची पूर्तता.
शासकीय सेवेतील पदवीधरांची सूची, संपर्क यंत्रणा, स्वतंत्र
उपक्रम.शासकीय सेवेतील पदवीधरांच्या समस्या निराकरणासाठी प्रयत्न.
4.महिला वैद्य : पूर्ण पत्त्यांसह अद्ययावत सूची जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रम
5.विद्यार्थी : महाविद्यालयांची सूची, विद्यापीठ प्रमुख व महाविद्यालय प्रमुखांची नियुक्ती.
जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन:प्रथमवर्ष विद्यार्थी स्वागत.
इंटर्नीजसाठी परिसंवाद, कार्यशाळा, पदव्युत्तर शिक्षणासाठी मार्गदर्शन.अनुभवी वैद्यांकडे प्रशिक्षणाची
यो
जना.वैद्यकीय सेवाप्रकल्पांना भेटीसाठी सहलींचे आयोजन.विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रयत्न,
आंदोलन.शिक्षणानंतर पूर्णवेळ काम करण्याचे आवाहन.
6.अध्यापक : जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर, स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
समस्या निराकरणासाठी प्रयत्न, आंदोलन.
7.संस्था व संस्थाचालक : नियमित संपर्काची योजना, प्रासंगिक स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
8.सामाजिक उपक्रम: शिबिर योजना- व्याधींनुसार चिकित्सा शिबिरे व आरोग्यशिक्षण शिबिरे
शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद व तत्सम उपक्रम
सेवाप्रकल्प: उपेक्षित घटकांसाठी सेवाप्रकल्प आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सहाय्य राष्ट्रीय आरोग्यमोहिमांमध्ये सहभाग.
9. संशोधन: विविध आयुर्वेदीय संस्था व पदवीधरांना संशोधनासाठी प्रवृत्त करणे.संशोधन संस्थांमध्ये समन्वय व
सुसुत्रता आणणे.शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेले संशोधन आयुर्वेदेतर वैद्यकीय समुदायासमोर व समाजासमोर
प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी उपक्रम योजणे.
समन्वय: अ) संघप्रेरीत वैद्यकीय संघटना : अशा संस्था, संघटना, रुग्णालये यांच्या महत्वाच्या प्रत्येक
वैद्यकीय घडामोडीत व्यासपिठाचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग व अशा प्रसंगी
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यासपिठाच्या भूमिकेची मांडणी
आ) आयुर्वेदाच्या क्षेत्रातील अन्य संस्था, संघटना, चळवळी, आंदोलने, उपक्रम: यामधील सक्रीय घटकांशी
संपर्क, व्यासपिठच्या ध्येयधोरणांशी त्यांचा परिचय व क्रमश: त्यांना व्यासपिठाच्या भूमिकेने
प्रभावित करणे. प्रांतीय, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत
व्यासपिठाचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभाग व अशा शक्य त्या प्रत्येक प्रसंगी
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यासपिठाच्या भूमिकेची मांडणी.
इ) आयुर्वेदेतर वैद्यकीय समुदाय: विविध स्तरांवर क्रमश: संपर्काची व त्यांना व्यासपिठाच्या ध्येयधोरणांशी
परिचित करण्याची व व्यासपिठाच्या भूमिकेने प्रभावित करण्याची दीर्घकालीन योजना व त्या
दृष्टीने स्वतंत्र उपक्रमांचे आयोजन.
***
दि. 30.11.2000 (व्यासपिठाच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गठित झालेल्या पहिल्या कार्यकारी मंडळाच्या पहिल्या बैठकप्रसंगी विचारार्थ तयार केलेले टिपण.)

आयुर्वेद व्यासपीठ: संकल्पना व उद्दिष्टे

आयुर्वेद व्यासपीठ: संकल्पना व उद्दिष्टे

1. विद्यार्थ्यांपासून संस्थाचालकांपर्यंत, औषधीवनस्पतींची लागवड करणार्‍यांपासून कारखानदारांपर्यंत व वैद्यक व्यावसायिकांपासून शासकीय यंत्रणेपर्यंत आयुर्वेदाशी संबंधित सर्व घटकांना एका सुत्रात गुंफणारे ‘व्यापक संघटन’.
2. शालेय विद्यार्थ्यांपासून जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचवणारा व दैनंदीन जीवनात आयुर्वेद रुजवणारा प्रचार, प्रसार व लोकशिक्षणाचा ‘व्यापक उपक्रम’.
3. आयुर्वेदाच्या अंगभूत सामर्थ्याची प्रचिती जागवून आयुर्वेद व्यावसायिकांमध्ये उत्साह, आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण करण्याचा ‘प्रामाणिक प्रयत्न’.
4. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील विभिन्न समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने, निस्वार्थपणे व संघटितपणे संघर्ष करणारी ‘प्रभावी चळवळ’.
5. आयुर्वेदाच्या मूळ अधिष्ठानाचे जतन व संरक्षण करतांनाच माहिती विस्फोटाच्या या कालखंडातील अद्ययावत ज्ञान व नवनवीन आव्हाने समर्थपणे पेलणार्या नव्या आयुर्वेदीय शिक्षणपद्धतीच्या विकासाला चालना देणारे ‘अभ्यासकेंद्र’
6. आरोग्याच्या क्षेत्रातील आजची आव्हाने व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या समस्या यांच्या निराकरणासाठी प्राचीन संहिता ग्रंथातील ज्ञान, हजारो वर्षांच्या वैद्यपरंपरेचे संचित व आधुनिक वैद्यकतंत्राने विस्तारलेली क्षितिजे या सर्वांच्या सुसुत्र संयोजनातून आयुर्वेदातील संशोधनाला योग्य दिशा व गती देणारे ‘शास्त्रीय विचारमंथन’.
7. वैद्यकीय क्षेत्रातून लुप्त होत असलेला सेवाभाव व नैतिकता पुनश्च प्रस्थापित करून व्यवसायाबरोबरच समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत राहाण्याची प्रेरणा देणारे एक ‘संस्कार केंद्र’
8. आयुर्वेदाच्या क्षेत्रात आज देशविदेशात चालणार्‍या अनेक संस्था, संघटना, चळवळी व उपक्रम यांना निखळ स्नेहाने व आयुर्वेद उत्थानाच्या विशुद्ध प्रेरणेने एकत्र आणून समान्वय साधणारे ‘व्यापक व्यासपीठ’
***

आयुर्वेद व्यासपीठ: दिशा, धोरण आणि उपक्रम

आयुर्वेद व्यासपीठ: दिशा, धोरण आणि उपक्रम

1925 साली संघाच्या रुपाने सुरू झालेल्या राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या प्रक्रियेला आज विराट स्वरूप प्राप्त झाले आहे. या पुनरुत्थानाच्या प्रक्रियेचे स्वरूप आज विद्यमान असलेल्या समस्या व आव्हानांचे हिंदुत्वाच्या आधारावर निराकरण करून, हिंदू जीवनदर्शनाला अनुरूप आदर्श समाजजीवनाची निर्मिती हे आहे. हिंदू जीवन दर्शन असे मानते की जीवनाचे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीत विद्यमान असलेल्या पूर्णत्वाची त्या व्यक्तिच्या क्षमतेनुसार प्राप्ती करणे हे होय. या पूर्णत्वाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे हे त्या व्यक्तीच्या जीवनाचे लक्ष्य, तर त्या व्यक्तीच्या प्रयत्नांना पोषक वातावरण निर्माण करणॆ हे समाजाचे कर्तव्य. या अधिष्ठानावर आधारित राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे प्रयत्न संघप्रेरीत काम करणार्याव संघटनांच्या द्वारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आज सुरू आहेत. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात हे प्रयत्न सुरू आहेत. असेच प्रयत्न वैद्यकीय क्षेत्रातही सुरू आहेत. या प्रयत्नातुनच आयुर्वेद व्यासपिठाचा जन्म झाला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना कार्यकर्त्यांना हिंदू जीवनदर्शनातून उत्पन्न झालेले आयुर्वेद व योगाचे अधिष्ठान उपलब्ध आहे. स्वाभाविकच वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाच्या कार्यात आयुर्वेद व्यासपीठ व म्हणून व्यासपिठाचे कार्यकर्ते अग्रभागी असतील. वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना आयुर्वेद व योगाच्या अधिष्ठानावर ठाम राहून पण उपलब्ध माहिती, प्रगती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून या क्षेत्रातील आजच्या सर्व आव्हानांना तोंड देत नवी रचना उभी करावी लागेल. या जाणिवेतुनच कामाच्या धोरण व उपक्रमांचा विचार करावा लागेल.

नव्या संदर्भात तत्वचिंतन
व्यासपिठाच्या कामाचा विचार करतांना या कामाच्या विविध आयामांचा विचार करावा लागेल. आजच्या काळातही आयुर्वेदाचे अधिष्ठान उपयुक्त, परिणामकारक व कालोचित आहे हे वैद्यकविश्वाच्या आजच्या स्थितीच्या पार्श्वभुमीवर व आजच्या समस्यांच्या संदर्भात प्रभावीपणे व शास्त्रशुद्ध रितीने मांडावे लागेल. एक समग्र, एकात्म, तर्कशुद्ध शास्त्र, एक परिणामकारक, आजच्या सर्वप्रकारच्या वैद्यकीय समस्यांना हाताळण्यास सक्षम व यशस्वी चिकित्सापद्धती व निरामय जीवन जगण्यासाठी एक संपूर्ण जीवनपद्धती अशा विविध प्रकारे ही मांडणी करावी लागेल.

संघटनात्मक उभारणी
वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचे कार्य करतांना संघटना उभारणीसाठी व ही मांडणी वैद्यकविश्वापर्यंत व समाजासमोर नेण्यासाठी संपर्क व संघटना बांधणीचा अग्रक्रम ठरवावा लागेल. आयुर्वेद पदवीधरातील आज जे निष्ठेने आयुर्वेदाचा अंगिकार करतात त्यांच्यापासून प्रारंभ करून क्रमश: आज निष्ठेने आयुर्वेदाचा अंगिकार करत नसले तरी आयुर्वेदाचे पदवीधर असलेले अन्य चिकित्सक, आयुर्वेदाची आवड व आयुर्वेदाचा अभ्यास असलेले अन्य वैद्यकप्रणालींचे वैद्यकव्यवसायीक, संघसंबंधित अन्य वैद्यकप्रणालींचे वैद्यकव्यवसायीक व अंतिमत: सर्व वैद्यकव्यवसायीक आज ना उद्या व्यासपिठाच्या कक्षेत आणावे लागतील.

प्रचार आणि प्रसार
एकीकडे वैद्यकविश्वापर्यंत आयुर्वेद पोहोचवतांनाच, दुसरीकडे संपूर्ण समाजासमोरही आयुर्वेदाला नेण्यासाठी प्रचार आणि प्रसाराचे विविध उपक्रम राबवावे लागतील. आहार विहार, दिनचर्या, ऋतुचर्या इ. विषयांवर व्याख्याने, लेख, आकाशवाणी व दूरदर्शनवर सादरीकरण आदि माध्यमातून समाजात आयुर्वेद पोहोचवावा लागेल, रुजवावा लागेल. सर्वसामान्य रोगनिदान शिबिरे व विविध व्याधीनुसार शिबिरांच्या माध्यमातून एक प्रभावी चिकित्सापद्धती म्हणून आयुर्वेदाला व या चिकित्सापद्धतिचा आजचा आधारस्तंभ म्हणून व्यासपिठाला प्रतिष्ठापित करावे लागेल.

शिक्षण
शिक्षणक्षेत्राच्या संदर्भात एकीकडे या क्षेत्रातील अध्यापक, विद्यार्थी, संस्थाचालक अशा विविध घटकांना व्यासपिठाशी जोडण्यासाठी, त्या त्या स्तरावर रचना करण्याच्या कामाबरोबरच या क्षेत्रातील आजच्या समस्या सोडवण्यासाठी विधायक व संघर्षात्मक प्रयत्न करावे लागतील, तर दुसरीकडे शिक्षणपद्धतीतले दोष दूर करून आजच्या सर्व वैद्यकीय आव्हानांना पेलण्यासाठी समर्थ असा स्नातक घडवण्यासाठी सुयोग्य अशा शिक्षणपद्धतीच्या उभारणीसाठी प्रयत्न करावे लागतील. आयुर्वेदेतर चिकित्सा प्रणालींच्या अभ्यासक्रमातही आयुर्वेदाचा योग्य त्या पद्धतीने समावेष व्हावा म्हणून प्रयत्न करावे लागतील.

स्वास्थ्यसेवायंत्रणा
सार्वजनिक स्वास्थ्यसेवा यंत्रणेच्या (Public health services) संदर्भात, आज या क्षेत्रात असलेल्या आयुर्वेदीय घटकांना व्यासपिठाशी जोडणे, या यंत्रणेत व या यंत्रणेद्वारा राबवल्या जात असलेल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात (National health programmes) आयुर्वेदाला योग्य ते स्थान मिळवून देणे व क्रमश: या संपूर्ण क्षेत्रालाच आयुर्वेदाच्या प्रभावाखाली आणण्याच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील.

संशोधन
संशोधनाच्या संदर्भात, प्रत्यक्ष संशोधन करण्यासाठी लागणारी संरचना (Infrastructure) व्यासपिठाजवळ नसल्याने – व असणे आजतरी अपेक्षित नसल्याने – व्यासपीठ म्हणून संशोधन करणे शक्य, उचित व आवश्यकही नाही. पण आवश्यक व योग्य त्या विषयांवर संशोधन होण्यासाठी अभासकांना प्रवृत्त करणे, उपयुक्त असे झालेले संशोधन आवश्यकतेनुसार व योग्यतेनुसार आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसमोर, अभ्यासकांसमोर, अन्य वैद्यकव्यावसायिकांसमोर व समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमात आयुर्वेदाला शेवटचे स्थान असते. अशा विद्यार्थ्यांसमोर हे संशोधन योग्य त्या पद्धतीने आले तर हा प्राधान्यक्रम बदलू शकतो व गुणी विद्यार्थी या क्षेत्राला उपलब्ध होऊ शकतात.

सेवा
सेवेच्या संदर्भात आज विभिन्न संस्था संघटनांद्वारा सुरू असलेल्या सेवा प्रकल्पात व्यासपिठाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग, त्या प्रकल्पात आयुर्वेदाचा अंतर्भाव व पूर्णपणे आयुर्वेदावर आधारित नव्या सेवाप्रकल्पांचा प्रारंभ या दिशेने प्रयत्न करावे लागतील.

समन्वय
हिंदू जीवनदर्शनातून उत्पन्न झालेले आयुर्वेद व योगाचे अधिष्ठान हे वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाचा आधार असल्याने पुनर्निर्माणाच्या कार्यात आयुर्वेद व्यासपीठ व म्हणून व्यासपिठाचे कार्यकर्ते अग्रभागी असले पाहिजे, इतकेच नव्हे तर आज ना उद्या त्यांनीच या चळवळीतील सर्व अन्य संघटनांमध्ये समन्वय निर्माण केला पाहिजे. व्यासपिठाच्या पुर्वीपासून सुरू असलेल्या विश्व आयुर्वेद परिषद, नॅशनल मेडिकोज ऑर्गनायजेशन (NMO) सारख्या संघटना, आज कार्यरत असलेल्या आरोग्यभारती, वैद्यकीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटना व वैद्यकीय सेवा प्रकल्प ज्यांच्या कामाचे महत्वपूर्ण अंग आहे अशा सेवाभारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, दीनदयाळ शोध संस्थान, भारत विकास परिषद अशा संघटनाचे कार्य वैद्यकीय क्षेत्रातील पुनर्निर्माणाच्या संदर्भात उपयुक्त, अर्थपूर्ण व फलदायी व्हायचे असेल तर त्यांच्या कामाला आयुर्वेदाचा परिसस्पर्श झाला पाहिजे व ही जवाबदारी आयुर्वेद व्यासपिठालाच पार पाडावी लागेल.
********
(3.10.99 ला मोतीबाग पुणे येथे झालेल्या व्यासपिठाच्या बैठकीत मांडलेल्या विषयाचे प्रारूप)

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

आरक्षण प्रकरणी सामंजस्यपूर्ण चर्चेची आवश्यकता

आरक्षण प्रकरणी सामंजस्यपूर्ण चर्चेची आवश्यकता
आयुर्वेद व्यासपिठाचे आवाहन

आयुर्वेद व्यासपीठ हे आयुर्वेदाशी संबंधित सर्व घटकांना संघटित करून वैद्यक क्षेत्रातील आजच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक परिवर्तन घडवून आणणारे संगठन आहे. त्याबरोबरच आयुर्वेद व्यासपीठ एकसंध व समरस समाजनिर्मितीसाठीही प्रतिबद्ध आहे.
आज आरक्षणाच्या प्रश्नावरून जो संघर्ष निर्माण झाला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे असे व्यासपिठाचे मत आहे. समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या प्रक्रियेत समाजातील दुर्बल घटकांचा विकास हा अग्रक्रमाचा विषय असला पाहिजे किंबहुना समाजाच्या सर्वांगिण विकासाच्या प्रक्रियेत लवकरात लवकर कोणीही दुर्बल किंवा मागासलेला राहाणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याचेच ध्येय सगळयांच्या समोर असले पाहिजे अशी व्यासपिठाची धारणा आहे. म्हणूनच जोपर्यंत समाजात वंचित दुर्बल घटक शिल्लक आहेत तोपर्यंत त्यांच्या विकासासाठी आरक्षण असलेच पाहिजे ही आयुर्वेद व्यासपीठाची भूमिका आहे.
परंतु या भूमिकेचा पाठपुरावा करतांनाच आरक्षणाच्या प्रावधानामागचे उद्देश साध्य होतील व खरोखरच दुर्बल किंवा मागासलेल्या समाज घटकांनाच त्याचा लाभ होईल अशाच रितीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असे आयुर्वेद व्यासपीठाला चाटते. खरे वंचित दूर राहून तथाकथित मागासलेल्या जातीतील प्रगत व विकसित व्यक्तीच जर आरक्षणाचा लाभ घेत असतील तर तो आरक्षणाच्या धोरणाचा पराभव मानला पाहिजे. आज आरक्षणविरोधी वातावरण निर्माण होण्यामागे हेही एक कारण आहे हे समजून घेतले पाहिजे.
कुठल्याही समस्येचा राजकीय लाभासाठी वापर करण्याची जी घातक परंपरा निर्माण झाली आहे तिने आरक्षणाची समस्या चिघळवली आहे. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी समाजात विद्वेष निर्माण करणारे बेजवाबदार राजकारणी या संघर्षामागचे खरे गुन्हेगार आहेत. आरक्षणाचे समर्थन व विरोध करणार्‍या राजकारण्यांना रस केवळ मतपेटीच्या राजकारणात आहे हे ओळखून या आंदोलनात उतरणार्‍यांनी आपण स्वार्थांध राजकारण्यांच्या हातातले बाहुले बनणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
आज असंख्य भीषण समस्यांनी ग्रस्त समाजाला विद्वेषाच्या खाईत लोटणार्‍या संघर्षापासून वाचवण्यासाठी आरक्षणासारखे विषय राजकारण्यांच्या पकडीतून सोडवून निकोप व एकसंध एकरस समाजनिर्मितीसाठी झटणार्‍या सर्व संघटना व चळवळींनी परस्परातले पूर्वग्रह व अभिनिवेष बाजूला ठेवून त्यावर सामंजस्यपूर्ण वातावरणात सर्वंकष चर्चा करण्याची गरज आहे.
आज हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व न्यायालयाने जी समतोल भूमिका या संदर्भात घेतली आहे तिचा सर्वांनीच आदर करून सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे व सामंजस्यपूर्ण चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे असे सर्व संबंधित घटकांना व्यासपिठाचे कळकळीचे आवाहन आहे.

अभ्यासवर्गासाठी प्रारूप

अभ्यासवर्गासाठी प्रारूप
दोन दिवसांच्या अभ्यासवर्गात पहिला दिवस प्रामुख्याने कार्यक्रम व तपशिलासाठी, तर दुसरा दिवस ध्येयधोरणे व दिशादर्शनासाठी असावा. दोन्ही दिवशी एक गटश: सत्र व एक मुक्तचिंतनाचे सत्र असावे.
पहिला दिवस
1. आयुर्वेदासाठी कर्यरत संघटना व चळवळींचा इतिहास, आजच्या आव्हानांना पेलण्याची त्यांची क्षमता.
2. आयुर्वेद व्यासपिठाची आवश्यकता, भूमिका, संकल्पना, उद्दिष्टे व वाटचाल.
3. जिल्हाश: परिचय व निवेदने .
4. आदर्श नियोजन – शिबिर, कार्यशाळा, परिसंवाद, शास्त्रचर्चासत्र, संशोधन प्रकल्प.
5. श्रेणीश: बैठका – व्यावसायिक, विद्यार्थी, प्राध्यापक, स्त्रीवैद्य. पदाधिकार्यां च्या बैठका – अध्यक्ष/उपाध्यक्ष, कार्यवाह/सहकार्यवाह, कोषाध्यक्ष, प्रकल्प प्रमुख, महाविद्यालय
प्रमुख
6. मुक्तचिंतन: व्यासपिठाच्या कार्यवाढीसाठी विविध उपक्रम.

दुसरा दिवस

1. भारताचा सांस्कृतिक वारसा व आजच्या समस्यांची उत्तरे, विश्वगुरू भारत (एक गुलाम देश ते महासत्ता)
2. शास्त्रचर्चासत्र.
3. मुक्तचिंतन: वैद्यकक्षेत्रातील/आयुर्वेदासमोरची आजची आव्हाने व त्यांचे निराकरण.
4. कामाचा आधार कार्यकर्ता: कार्यकर्त्याचा विकास.
5. जिल्हाश: बैठका: कार्यवाढीचा संकल्प, आगामी कार्यक्रम.
6. समारोप- यशाने दुमदुमवू त्रिभुवने.
***
 शक्य त्या सर्व सत्रांची (1,2,4/1ला व 2रा दिवस) टिपणे वर्गापूर्वी एकत्र करून समारोपानंतर वितरण.
 पहिल्या दिवशीच्या सत्र 4 मध्ये एकेका कार्यकर्त्याने एकेका उपक्रमाच्या नियोजनाचे प्रारूप मांडावे.
 पहिल्या दिवस अखेरीस कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी किमान कार्यक्रम निश्चित करून दुसर्यान दिवशीच्या 4 थ्या सत्राच्या शेवटी त्याची घोषणा, जिल्हाश: बैठकीत त्याची योजना व समारोपाच्या सत्रारंभी त्याचे निवेदन.
 पहिल्या दिवशी पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात उदघाटन, संध्याकाळी खेळ/भ्रमण, रात्री विविधगुणदर्शन. दुसर्‍या दिवशी पहाटे योगासने.

आयुर्वेद व्यासपीठ: अधिष्ठान व कार्याची दिशा

आयुर्वेद व्यासपीठ: अधिष्ठान व कार्याची दिशा

अभ्यासवर्ग: पिंपळद 13.5.2000
संघटनेच्या वाटचालीत अभ्यासवर्गांची योजना ही संघटनेच्या ध्येयधोरणांना आत्मसात करण्यासाठी व संघटनेने स्विकारलेल्या कार्यपद्धतीचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी असते. या दृष्टीने आपल्यासाठी दोन्ही संदर्भात कौशल्य संपादन करण्याची ही संधी असते.
कुठल्याही संघटनेची कालोचितता, यथार्थता व सार्थकता ही केवळ त्या संघटनेच्या संदर्भात तपासून पाहाणे पुरेसे नसते, तर तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात, समाजाच्या-देशाच्या वाटचालीसाठी-प्रगतीसाठी उपयुक्ततेच्या निकषावर ती तपासावी लागते.
सर्वच संघटना सारख्या नसतात, नसाव्याही. प्रत्येक संघटनेची प्रकृती, प्रवृत्ती वेगळी असते, त्या संघटनेच्या निर्मितीचे प्रयोजन वेगळे असते व त्यानुसार त्या संघटनेचे जिवितकार्यही (Life mission) वेगळे असते. या सगळ्या पैलूंना अनुसरून त्या संघटनेच्या समोरचे लक्ष्य, दिशा व वाटचालीची गती ठरत असते. या संदर्भात आयुर्वेद व्यासपिठाचा विचार कसा करता येईल हे या अभ्यासवर्गात विविध सत्रातून आपल्याला स्पष्ट होईल.
व्यासपिठाची निर्मिती ही एक स्वतंत्र संघटना म्हणून जशी झाली आहे तद्वतच ती नव्या भारताच्या उभारणीच्या विराट चळवळीचे एक अंग या स्वरूपातही झाली आहे. जगाच्या रंगमंचावर भारत आज नव्या भूमिकेत, नव्या स्वरूपात समोर येतो आहे जागतिक आर्थिक व्यवहारात भारताचा निर्यातीचा वाटा 1980-81 साली 5.5% होता, 1996-97 मध्ये तो 10.3% होता. अर्थतज्ञांचे भाकीत असे आहे की अमेरिका आज 1929 सारख्याच भीषण मंदीच्या उंबरठ्यावर उभी आहे, व या मंदीत अमेरिकन अर्थसत्ता कोसळली तर भारत एक महासत्ता म्हणून समोर येऊ शकतो. याचे कारण असे आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची काही बलस्थाने आहेत.
1. भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक बाजारपेठेशी संबंध कमी आहे.
2. भारतात विदेशी निवेश कमी आहे.
3. भारताच्या एकूण व्यापारात सरकारचे स्थान मर्यादित आहे.
4. भारतातील सुदृढ व्यापारी वर्ग.
या बलस्थानांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था कारगील युद्धात स्थिर होती व अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांनाही पुरून उरली.
राजकीय मुत्सद्देगिरीत आज भारत वरचढ ठरतो आहे. CTBT वर स्वाक्षरीचा विषय असो, सिएटलच्या परिषदेत श्रममानक प्रस्ताव धुडकावण्याचा निर्णय असो किंवा सार्क परिषदेत पाकीस्तानवर मात करणारे डावपेच असोत, भारताच्या राजकीय इच्छाशक्तीचा जगाला प्रत्यय येतो आहे. त्यामुळेच अमेरिकेला नाइलाजाने आर्थिक निर्बंध उठवावे लागले.
संरक्षण सिद्धतेत भारत आज जागतिक दर्जा गाठतो आहे. कारगिलच्या युद्धाने हे सिद्ध केले आहे की भारतीय सैनिक हा जगातला प्रथम श्रेणीचा सैनिक आहे. भारतीय संरक्षण दलात समाविष्ट झालेली त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग सारखी अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रे स्वसंरक्षण व आक्रमकांवर प्रत्याघात करण्यासाठी सज्ज आहेत. विज्ञान आणि तत्रज्ञानात आज भारत आघाडीवर आहे. भारताचा अंतरिक्ष कार्यक्रम आज चंद्रकक्षेत प्रवेश करतो आहे. वैमानिक विरहित स्वनातीत विमानांची निर्मिती असो किंवा अणुसंशोधन असो आज भारत जगात अग्रेसर आहे. उपग्रह निर्मितीच केवळ नव्हे तर उपग्रह प्रक्षेपणाच्या क्षेत्रातही भारत स्वयंपूर्ण झाला आहे, व अतिप्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. अतिप्रगत संगणक निर्मितीत अनुराग, अनुपम, परम व परम दशसहस्त्र सारख्या अतिप्रगत संगणकांनी सिंगापूरच्या आंतर्राष्ट्रीय संगणक तंत्रज्ञान परिषदेत खळबळ माजवली आहे.
विद्याधर गोखल्यांचे गुण व क्षमता पाहून त्यांचे वडील संभाजीराव त्यांना म्हणाले की नागपूरच्या शुक्रवार तलावात डुबक्या मारू नकोस, मुंबईच्या समुद्रात उतर; आणि विद्याधर गोखल्यांनी मुंबईत प्रवेश केला आणि पाहाता पाहाता मुंबईच्या साहित्य विश्वाचे ते अनभिषिक्त सम्राट बनले. आज भारतीय तरूणही आपल्या कर्तृत्वाने सातासमुद्रापार तळपत आहेत. अमेरिकेत आज 32 लाख भारतीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आहेत. अमेरिकेतले 38% डॉक्टर्स, 12% शास्त्रज्ञ, नासामध्ये 36%, माय्क्रोसॉफ्टमध्ये 34%, आयबीएममध्ये 28%, इंटेलमध्ये 17% व झेरॉक्समध्ये 13% भारतीय आहेत. लंडनच्या भुयारी रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे आणि संगणकीकरणाचे काम भारतीय शास्त्रज्ञ करतो आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातही जगभर भारताचा प्रभाव वाढतो आहे. भारतीय तत्वज्ञान, योग, आयुर्वेद यांचे स्वागत, मागणी व प्रभाव वाढतो आहे. रामकृष्ण आश्रम, विवेकानंद केंद्र, स्वाध्याय चळवळ, महर्षी महेश योगी, विपश्यना, या सर्वांचे काम जगभर वाढते आहे. नेपाळ मध्ये लुंबिनीला हिंदू-बौद्ध संमेलन झाले, त्याला 16 देशातील 550 प्रतिनिधी उपस्थित होते. मार्गदर्शनासाठी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, गयेचे भंते ज्ञानजगत, जपानचे भिक्षू उचिदा उपस्थित होते. नालंदा बुद्धविहाराच्या उभारणीत जपान सहाय्य करणार असल्याची घोषणा या प्रसंगी करण्यात आली. इंडोनेशिया या जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अब्दुल वाहीद यांनी निवडून आल्यानंतर अग्रक्रमाने भारताला भेट दिली व भारताबरोबरचे संबंध दृढ करण्याची इछा व्यक्त केली. मलेशिया या मुस्लिम देशातल्या एका खटल्यात मुस्लिमांनी मशिदीजवळच्या एका हिंदू मंदिरातील घंटानादाने नमाजाला अडथळा येतो म्हणून तो घंटानाद बंद करावा अशी मागणी केली होती, न्यायालयाने हे मंदिर 100 वर्षापासून तिथे आहे व त्यामुळे त्याविषयी आता तक्रार करता येणार नाही असा निर्णय दिला. न्यूयॉर्क येथील विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलतांना तिथल्या राज्यपालांचे सचिव म्हणाले की अमेरिकेतील भारतियांनी “आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही जर तुमच्या संस्कृतीविषयी औदासिन्य दाखवले तर तुमच्यापेक्षा अमेरिकेचा अधिक तोटा होईल.” कॅलिफोर्नियातील सॅन दियागो येथील भारतीय तरूण अजय शहा याने सुरू केलेले हिंदू संकेतस्थळ (web site) हे जगातील सर्वाधिक पाहुणे खेचणार्‍या 10 संकेतस्थळांपैकी एक आहे. पूर्वी भारतावर खैबरखिडीतून आक्रमणे झाली, आता सायबरखिंडीतून होताहेत, या आक्रमणाविरुद्ध भारतीय तरुणांनी जय्यत तयारी केलेली आहे.
नव्या भारताचा हा अश्वमेध आज नव्या वैश्विक समीकरणांना जन्म देतो आहे. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेला सांस्कृतिक दिग्विजय चरम सिमेकडे वाटचाल करतो आहे, त्यातून हळूहळू एका नव्या विश्वसंस्कृतीची उभारणी होते आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जगाचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. अटलजी पंतप्रधान झाल्यावर अमेरिकन संसदेत भारतीय लोकशाहीच्या स्वागताचा ठराव 396/4 मतांनी संमत करण्यात आला. Indo-US Waltz (अमेरिकेतील एक संगीतप्रकार) चे नवे युग सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली. अमेरिकन अध्यक्षांना भारताबरोबर सहकार्य वाढवण्याची विनंती करण्यात आली. अटलजी पंतप्रधान झाल्यावर फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिरॅक यांनी आगामी काळात भारत महासत्ता होईल असे भाकीत केले. चीनचे राजदूत चाउ गांग यांनी पुण्यात बोलतांना भारत चीन संबंध सुधारण्यावर भर दिला व आपण एकमेकांचे उपयुक्त, विश्वासार्ह सहनिवासी आहोत असे प्रतिपादन केले. 1986 मध्ये मास्कोत भारत महोत्सवाचे उदघाटन करतांना मिखाईल गॉर्बाचेव्ह यांनी भाषणाची सुरूवात गीतेतल्या दुसर्‍या अध्यायातल्या श्लोकांनी केली व गीतेचे तत्वज्ञानच जगाला मार्ग दाखवू शकते असे सांगितले. इंग्लंडच्या पंतप्रधान असलेल्या मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडमधील विराट हिंदू संमेलनात बोलतांना कुटुंब संस्थेसारख्या अनेक गोष्टी जगाने भारतीय संस्कृतीकडून शिकण्यासारख्या आहेत असे सांगितले. दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला 27 वर्षांच्या प्रदीर्घ बंदीवासातून सुटल्यावर सर्वप्रथम भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त करतात. विश्व इतिहासाचे प्रख्यात भाष्यकार अर्नॉल्ड टॉयन्बी यांच्या द्रष्ट्या शब्दांची प्रचिती या सर्व घटनांमधून येते आहे. त्यांचे शब्द आहेत “मानवी इतिहासाच्या या अत्यंत भयंकर क्षणी मानवजातीसाठी मुक्तीचा एकमेव मार्ग हा भारतीय मार्ग आहे.... भारताच्या शिरावर ही मोठी आध्यात्मिक जवाबदारी आहे.” (At this supremely dangerous moment of human history, the only way of salvation for mankind is an Indian way…. A great spiritual responsibility rests on India. )
जगाच्या रंगमंचावर भारताची ही नवी ओळख होत असली तरी आपल्या देशात काय स्थिती आहे ते विसरून चालणार नाही. कवी विठ्ठल वाघ म्हणतात ‘ चंद्र सूर्य आले जरी हाती, पायाखालची सुटू नये माती ’ सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज पंचाहत्तर हजार कोटी रुपये आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओरिसा या राज्यांच्या कर्मचार्‍याना पुढच्या महिन्याच्या पगाराची शाश्वती नसते. बिहारच्या कर्मचार्‍यांना आधीच महिनेनमहिने बिनपगाराची सवय आहे. (संदर्भ:National institute of public finance and policy) देशाची निम्मी लोकसंख्या शहरात राहाते. बहुसंख्य नागरिकांच्या पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शौचालयासारख्या मूलभूत गरजांचीही पूर्तता होत नाही.
आजपर्यंत समाजात व देशात क्षमता असूनही इच्छाशक्तिच्या अभावामुळे हे चित्र निर्माण झाले. आता हे चित्र बदलते आहे. पोखरणच्या स्फोटानंतर वॉशिंग्टन पोस्ट ने संपादकीय लिहिले “Angry India does it” बिल क्लिंटन म्हणाले “भारताला कोणी dictate करू शकणार नाही”
देशाच्या ह्या सुप्त क्षमतेला मूर्तरूप देऊन नव्या भारताची उभारणी करण्याचे काम केवळ राजकीय नेतृत्वाचे नाही, तर या समाजाचे चित्र बदलवून टाकण्यासाठी कृतसंकल्प संघटनांनाही ही जवाबदारी स्विकारावी लागेल. त्यासाठी संघटना तशी घडवावी लागेल.
संघटना जर प्रभावी व्हायची असेल तर संघटनेत शक्ती हवी. संघटनेची शक्ती संघटनेच्या सिद्धांतांवर निष्ठा ठेवणार्‍या कार्यकर्त्यांच्या संख्येवर, त्यांच्या कार्यक्षमतेवर व कामातील सातत्यावर अवलंबून असते. या सर्व गोष्टी संपर्कावर अवलंबून असतात. बैठकीत अचानक दिवे गेले, कोणीतरी घाइघाईत मेणबत्ती लावली, ती खाली पडली, कारण मेणबत्ती उभी करण्यापूर्वी खाली पुरेसे पातळ मेण लावले नव्हते. संघटना उभी करण्यासाठी संपर्काचे मेण आवश्यक असते. पण तो संपर्क स्नेहपूर्ण असावा, नि:स्वार्थ असावा.
संघटना वाढवण्यासाठी आपल्या सिद्धांतांवर आपली अभेद्य निष्ठा ठेवतांनाच आपला व्यवहार मात्र विरोधकांनाही जिंकणारा असावा. 1984 मध्ये इंग्लंडच्या 48 शहरातून आलेल्या 1200 स्वयंसेवकांचा विशाल हिंदू संगम ब्रॅडफर्डला सुरू होता. त्याच्या विरोधात खलिस्तानवादी शिखांची निदर्शने सुरू होती. घोषणा देऊन थकलेल्या निदर्शकांना संयोजकांनी अल्पाहारासाठी निमंत्रित केले. आत लावलेल्या प्रदर्शनीत जेंव्हा निदर्शकांनी शीख पंथाच्या दहा गुरूंच्या प्रतिमा पाहिल्या तेंव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी संयोजकांना दुसर्‍या दिवशी निघणार्‍या मॅरॅथॉन स्पर्धेचा शेवट गुरुद्वारापाशी करावा अशी विनंती केली व तिथे त्यांच्यातर्फे अल्पाहाराची व्यवस्था होईल असे सागितले. 1967 संघाच्या महाशिबिरात एका स्वयंसेवकाने जनसंघाचे महामंत्री असलेल्या दीनदयाळजींना प्रश्न विचारला ‘येणार्या. निवडणुकीत किती ठिकाणी आपले किती लोक निवडून येतील?’ पंडीतजी म्हणाले ‘स्वयंसेवक म्हणून विचारत असशील तर सर्व ठिकाणी आपलेच लोक निवडून येतील. जनसंघाच्या दृष्टीने विचारत असशील तर वेगळा हिशोब करावा लागेल.’
संघटनेचे काम करतांना आजुबाजुच्या स्थितीचे, समाजाचे भानही हवे. आचार्य नागार्जुनांनी दोन शिष्यांना तीन दिवसात एक रसायन सिद्ध करण्याचे काम दिले. तीन दिवसानंतर दोन्ही शिष्य परत आले. पहिल्याने सांगितले की घरी आई आजारी होती, वडील पंगू आहेत, शेजारच्या घरात एकाचा डोळा फुटला होता, पण मी कोणाकडेही लक्ष न देता तुमच्या आज्ञेप्रमाणे रसायन सिद्ध करून आणले आहे. दुसरा शिष्य म्हणाला की आईवडील आजारी होते, त्यांची शुश्रुषा केली, गावात पटकीची साथ आली होती, त्यासाठी गावकर्‍याना मदत करण्यात वेळ गेला, त्यामुळे रसायन सिद्ध करायला वेळच मिळाला नाही. आचार्यांनी दुसर्‍या शिष्याची पाठ थोपटली.
नव्या भारताची आधारशीला, भारताचे सांस्कृतिक अधिष्ठान काय आहे हे समजून घ्यावे लागेल. भारतीय संस्कृतिच्या वाटचालीत पिढ्यानपिढ्या मानवाचे, मानवी समाजाचे, सभोवताल असलेल्या सृष्टीचे व या सर्वांचे नियमन करणार्‍या मूलभूत नियमांचे खरे स्वरूप काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या शोधात गवसलेल्या सत्त्याच्या प्रकाशात या मूलभूत नियमांच्या - ज्यांना धर्म संबोधण्यात आले- आधारे व्यक्तीच्या व मानवी समाजाच्या जीवनात परिवर्तन करून ते अधिकाधिक सुखी, आनंदमय व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती व स्वरूप भिन्न असल्याने, त्याच्या जीवनात या मूलभूत नियमांना अनुसरण्याचा मार्ग – याला त्या व्यक्तीचा धर्म संबोधण्यात आले – भिन्न असेल हे लक्षात घेऊन सुखी, आनंदमय व परिपूर्ण जीवनाच्या लक्ष्याकडे वाटचाल करण्याचे अगणित मार्ग भारतीय संस्कृतिच्या वाटचालीत विकसित झाले. दुर्गा सप्तशतीत याचे सुंदर वर्णन आहे “ऋचिनां वैचित्र्याद् ऋजुकुटिल नाना पथजुषां, नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्ण इव’’ ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी शेवटी एकाच सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे आपापल्या रुचीप्रमाणे वाटचाल करणारे सर्वजण एकाच सत्त्याकडे जातात.
भारतामध्ये मनुष्य, अन्य प्राणी व सृष्टी यामध्ये प्रचंड विविधता आहे, जणु जगातले सर्व वैविध्य भारतात एकवटले आहे. ही नियतीचीच योजना आहे. इतके वैविध्य असणार्‍या ठिकाणी एखादी पद्धती यशस्वी झाली तर ती जगात कुठेही यशस्वी होऊ शकेल. भारतात एके काळी या पद्धतीने व्यक्तीमात्रांसाठी त्यांच्यात्यांच्या आवश्यकतेप्रमाणे विकासाचे, पूर्णत्वप्राप्तीसाठी वाटचाल करण्याचे अगणित मार्ग उपलब्ध करून दिले, व त्याचबरोबर मूलभूत नियमांच्या - ज्यांना धर्म संबोधण्यात आले- प्रकाशात जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करून एका आदर्श मानवी समाजाची जडण घडण केली. तेच या प्राचीन राष्ट्राचे चिरंतन जीवितकार्य होते व आहे.
वैद्यकक्षेत्रात आज याच अधिष्ठानावर उपलब्ध सर्व माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदाधिष्ठीत नवी वैद्यकव्यवस्था उभी करण्याची जवाबदारी व्यासपिठावर आहे. आज पाश्चात्य वैद्यकाच्या मर्यादा स्पष्ट होताहेत. एका मृत व्यक्तीच्या थडग्यावर त्याच्या मुलाने लिहिले होते, “In memory of my father, gone to join, his appendix, tonsils, olfactory nerve, a kidney, an eardrum and a leg prematurely removed by an intern, who needed experience.” त्यामुळे दुसर्‍याi कोणीतरी त्याच्या गरजेप्रमाणे तयार केलेल्या साच्याचे अंधानुकरण न करता मा. दत्तोपंत ठेंगडींनी निर्दिष्ट केल्याप्रमाणे “ आम्ही आमच्या संस्कृती व परंपरेच्या प्रकाशात, आजच्या आवश्यकतांनुरूप व भविष्याच्या आकांक्षांना पूर्ण करणार्‍या प्रगती व विकासाच्या आराखड्याचे चिंतन केले पाहिजे.” (“We must conceive of our own model of progress and development in the light of our own culture, our past traditions, present requirements and aspirations for future.”)
ही जवाबदारी पूर्ण करण्यासाठी व्यासपिठाची एक शक्तीसंपन्न संघटना म्हणून उभारणी करावी लागेल. या संघटनेसाठी आपल्या ध्येयाचे स्पष्ट ज्ञान असणारे स्नेहशील कार्यकर्ते जेंव्हा सातत्याने स्वत:ला झोकून देऊन सक्रीय होतील तेव्हाच हे कार्य पूर्ण होईल. “ज्ञानिभ्यो व्यवसायिन:” बाबा आमटेंनी सार्थक जीवनाची व्याख्या “सातत्याने विधायक कार्यात सक्रीय राहाणे” अशी केली आहे. (Continuous creative activity). काम करतांना अनंत अडचणी येतील. समुद्राच्या किनार्‍यावर एक जण बराच वेळ उभा होता, दुसर्‍याने विचारले ‘कशासाठी उभा आहेस ?’ त्याने उत्तर दिले ‘स्नान करायचे आहे पण लाटा थांबण्याची वाट बघतो आहे’ अडचणीच्या लाटा येतच राहातील, त्यांच्यावर स्वार होऊन काम करावे लागेल. हा अभ्यासवर्ग त्यासाठीच आहे. अभ्यासवर्ग म्हणजे लक्ष्याच्या दिशेने प्रत्यंचा ताणलेले धनुष्य आहे, धनुष्यातून सुटणारा बाण म्हणजे आपण कार्यकर्ते आहोत. धनुष्यातून सुटलेला बाण मध्ये कुठेही न थांबता लक्ष्याचा वेध घेतो तद्वतच मध्ये न थांबता आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्याला काम करायचे आहे. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात “Arise, awake and stop not till the goal is reached.”

***

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

आयुर्वेद व्यासपीठ: उदगम आणि विकास

आयुर्वेद व्यासपीठ: उदगम आणि विकास

वाढता वाढता वाढे

काही तरूण कार्यकर्ते आयुर्वेदाच्या विविध चळवळीत काम करणारे,प्रवास करणारे......

भेटतात,चर्चा करतात,हळूहळू त्यातून उमलते एक स्वप्न अन् ध्यास
ते स्वप्न साकारण्याचा....

आजवरच्या उणीवा दूर करणारे,पण गरजा पूर्ण करणारे उभारुया एक सर्वसमावेषक व्यासपीठ आयुर्वेदाचे.......

‘राममळा’कोयनानगर जानेवारी 1998
महाराष्ट्राच्या अक्षरश: कानाकोपर्‍या तून जमले पाचपन्नास वैद्य.......

गहन शास्त्रचर्चेतून,तर्ककठोर वादविवादातून व थट्टामस्करीतूनही या अभ्यास वर्गात सिद्ध झाले एक रसायन......

आयुर्वेदाला नवसंजीवन देणारे हे रसायन घेऊन उत्साहाने भारलेल्या कार्यकर्त्यांनी
चौफेर कामाला प्रारंभ केला.....

आणि सुरू झाली कार्यक्रमांची,उपक्रमांची एक अखंड मालिका..
परिसंवाद,कार्यशाळा, शिबिरे,क्लिनिकल मिटींग्ज.....

शिक्षणसंस्थाचालकांच्या बैठकांपासून वनौषधी लागवड करणार्यान शेतकर्‍यांच्या मेळाव्यापर्यंत......

समस्यांच्या चर्चेसाठी आमदार नामदारांच्या भेटीपासून
पेटंट कायद्यावर विख्यात वैज्ञानिकांशी चर्चेपर्यंत.........

जेष्ठ जाणत्या वैद्यांच्या मार्गदर्शनापासून आरोग्यविज्ञान विद्यापिठाच्या कुलगुरूंच्या भेटीपर्यंत.......

शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद व स्वस्थवृत्त प्रकल्पापासून उपेक्षित वस्तीत माताबाल कल्याण केंद्र चालवण्यापर्यंत.......

राममळ्याच्या शृंखलेत खेडशिवापूर,नाशिक,सांगली....
वाढत्या संख्येच्या व गुणवत्तेच्या अभ्यासवर्गांची मालिका सुरू झाली...

आयुर्वेदाच्या इतिहासात प्रथमच शिक्षणानंतर
पूर्णवेळ आयुर्वेद प्रचार प्रसाराचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली..

कुठल्याही पदाची इच्छा न बाळगता स्वकष्टाने व स्वखर्चाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार्‍या‍ कार्यकर्त्यांच्या आधारावर आज....

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात नियमित क्लिनिकल मिटींग्ज,
विविध कार्यशाळा, परिसंवाद, शालेय प्रकल्प

आणि आयुर्वेदाच्या इतिहासात प्रथमच
1500 स्त्री वैद्यांचा नाशिकचा भव्य राज्यस्तरीय परिसंवाद ‘यशस्विनी’

तपस्वी वैद्यांपासून उत्साही विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षणतज्ञांपासून कारखानदारांपर्यंत
आयुर्वेदाच्या उत्थानाची व प्रगतीची आकांक्षा बाळगणार्या् सर्वांचे नगरचे भव्य एकत्रीकरण व्यासपीठाची दमदार वाटचाल सुरूच आहे, सर्वांना हार्दिक आवाहन करत

“आयुर्वेदाच्या महारथा या सारे मिळूनी ओढू या”
***


कारवा बढता गया

कुछ युवक कार्यकर्ता आयुर्वेद के अन्यान्य आंदालनोमे काम करनेवाले,प्रवास करनेवाले......

मिलते है,चर्चा करते है,धिरेधिरे उसमेसे उदीयमान होता है एक स्वप्न
और उसे साकार करनेकी एक आस....

आजतककी कमियां दूर करनेवाला,लेकिन आवश्यकताओको पूरा करनेवाला निर्माण करेंगे एक सर्वसमावेषक व्यासपीठ आयुर्वेदका.......

‘राममला’कोयनानगर जनवरी 1998 महाराष्ट्रके दूरदराज के शहर गाव से इकट्ठा हुए पाचपचास वैद्य.......

गहन शास्त्रचर्चा,तर्ककठोर वादविवाद के साथसाथ हंसीमजाकसे ओतप्रोत इस अभ्यास वर्गमे सिद्ध हुआ एक रसायन......

आयुर्वेदको नवसंजीवनी देनेवाला यह रसायन लेकर उत्साहसे पूर्ण कार्यकर्ताओने दसो दिशाओमे कार्य प्रारंभ किया.....

और शुरू हो गयी कार्यक्रमोकी,उपक्रमोकी एक अखंड मालिका.. परिचर्चा,कार्यशाला,शिबिर,क्लिनिकल मिटींग्ज.....

शिक्षासंस्थाओके संचालकोकी बैठक से लेकर वनौषधी बोनेवाले किसानोके मेलेतक......

समस्या सुलझानेके लिए विधायकोसे तथा मंत्रीगणोसे लेकर पेटंट कानून के बारेमे विख्यात वैज्ञानिकोसे विचारविमर्श .........

जेष्ठ जानकार वैद्यविदोके मार्गदर्शनसे लेकर स्वास्थ्यविज्ञान विश्वविद्यालय के कुलगुरूके साथ भेटवार्त्ता तक.......

विद्यालयोके शिक्षाक्रममे आयुर्वेद तथा स्वस्थवृत्त प्रकल्पसे लेकर सेवाबस्तीमे माताबालक कल्याण केंद्र चलानेतक.......

राममलेकी शृंखलामे खेडशिवापूर,नासिक,सांगली, आदि बढती संख्याके तथा गुणवत्ताके अभ्यासवर्गोकी मालिका ...

आयुर्वेदके इतिहासमे पहलीबार
शिक्षा के पश्चात पूर्णकालीन आयुर्वेद प्रचार प्रसारका कार्य करनेवाले कार्यकर्ताओकी टोली ..

किसीभी स्थान तथा लाभ की इच्छा न रखते हुए अपने कष्टसे और खर्चेसे संपूर्ण महाराष्ट्रका भ्रमण करनेवाले कार्यकर्तांओके बलपर आज....

महाराष्ट्रके अनेक जिलोमे नियमित क्लिनिकल मिटींग्ज,कार्यशालाए, परिचर्चाए,
विद्यालयोके पाठ्यक्रमोमे आयुर्वेद प्रकल्प..

और आयुर्वेदके इतिहासमे पहलीबार 1500 महिला वैद्योका विशाल राज्यस्तरीय संम्मेलन नासिक मे संपन्न.....
तपस्वी वैद्योसे लेकर छात्रोतक और शिक्षाविदोसे लेकर औषधी निर्माताओतक

आयुर्वेदके उत्थानकी और प्रगतीची आकांक्षा रखनेवाले सभीका नगरमे संगम व्यासपीठ की सशक्त यात्रा आगे बढ रही है सभीसे हार्दिक आवाहन करते हुए, आओ.........

हृदयमे भक्ति,हाथोमे शक्ति और पैरोमे गति लेकर

आयुर्वेदके इस महारथ को आगे बढाए ..
****



श्री धन्वंतरये नमः

कृण्वंतो विश्व स्वस्थम्

आयुर्वेदाच्या वटवृक्षाला नवी पालवी

हजारो वर्षांची समृद्ध प्राचीन परंपरा
असलेल्या व काळाच्या कठोर कसोटीवर श्रेष्ठतम उपचारपद्धती
म्हणून सिद्ध झालेल्या आयुर्वेदाच्या वटवृक्षाला फुटलेली नवी पालवी म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

वैद्य तितुका मेळवावा 
या भावनेने भारलेल्या तरूणांनी आयुर्वेदाच्या वटवृक्षाला बलशाली करणार्‍या.
सर्व घटकांना संघटनेच्या सुत्रात गुंफण्यासाठी आरंभलेले नवे पर्व म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

या आयुर्वेदाच्या वटवृक्षाची छाया
समाजाच्या सर्व अंगांपर्यंत पोहोचावी म्हणून घराघरात,शाळेत,कार्यालयात
आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी उपक्रमांची नवी मालिका म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

गहन संहिताग्रंथांचे पाथेय
अगणित प्रज्ञावान वैद्यांची समर्थ परंपरा आणि आधुनिक शास्त्रीय निकषांनाही मान्य झालेल्या
परिणामकारक उपचार पद्धतीच्या प्रत्ययातून उठणारा आत्मविश्वासाचा नवा हुंकार
म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

आधुनिक वैद्यकतंत्राचा पगडा
शासनाची अनास्था,समाजाची उदासीनता आणि व्यावसायिकांमधील न्यूनगंड यातून
फोफावलेल्या समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्षाचा नवा नारा
म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदाचे मूळ अधिष्ठान
अभंग राखून,आधुनिक वैज्ञानिक प्रगतीचा डोळस अंगिकार करून आजची आव्हाने
समर्थपणे पेलू शकणार्याा शिक्षणपद्धतीच्या विकासाची नवी उभारणी म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

शास्त्रोक्त सिद्धांत व ज्ञानाची विस्तारणारी क्षितिजे
यांच्या संयोजनातून आजच्या वैद्यक क्षेत्रातील आव्हानांचा स्विकार करून
संशोधनाच्या नव्या दिशांचा शोध म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

वैद्यकीय व्यवसायाचे आजचे चित्र त्यात शिरलेल्या अपप्रवृत्ती,
त्यामुळे निर्माण झालेला अविश्वास व संशय दूर सारून
या व्यवसायात पुन्हा सेवाभाव व नैतिकता रुजवण्याचा नवा संकल्प म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदाच्या उत्थानासाठी
कार्यरत देशविदेशातील व्यक्ती,संस्था,संघटना,चळवळी व उपक्रम
स्नेहाने व आत्मियतेने जोडण्याचा नवा ध्यास
म्हणजे आयुर्वेद व्यासपीठ...

***

श्री धन्वंतरये नमः

कृण्वंतो विश्व स्वस्थम्

आयुर्वेदके वटवृक्षका नवोन्मेष

हजारो वर्षोकी समृद्ध प्राचीन परंपरा का अधिष्ठान
और काल की कठोर कसौटीपर निखरी श्रेष्ठतम उपचारपद्धती
इस आयुर्वेदके वटवृक्षका नवोन्मेष यह है आयुर्वेद व्यासपीठ...

वैद्य सभी संगठित हो 
इस भावनासे अभिभूत युवकोद्वारा आयूर्वेदके वटवृक्षको बलशाली करनेवाले
सभी घटकेाको संघटनसूत्रमे बांधनेका नया पर्व यह है आयुर्वेद व्यासपीठ...

इस आयूर्वेदके वटवृक्षकी छाया
समाजके सभी अंगोतक पहुचाने के लिए घरघरमे,विद्यालयोमे,दफ्तरोमे
आयुर्वेदका प्रसार और प्रचार करनेके लिए उपक्रमोकी नयी मालिका यह है आयुर्वेद व्यासपीठ...

गहन संहिताग्रंथोका पाथेय
अगणित प्रज्ञावान वैद्यविदोकी समर्थ परंपरा और आधुनिक विज्ञान को भी मान्य
प्रभावशाली उपचारप्रणालीके अध्ययनसे
उठनेवाला आत्मविश्वासका नया स्वर यह है आयुर्वेद व्यासपीठ...

आधुनिक चिकित्साविज्ञानका दबाव
शासनकी अनास्था,समाजकी उदासीनता और वैद्योमे व्याप्त न्यूनगंडसे
बढी हुयी समस्यांओके चक्रव्यूहको भेदनेकेलिए संघर्षकी नयी लहर यह है आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदाके मूल अधिष्ठानको अक्षुण्ण रख आधुनिक विज्ञानके प्रगतीको स्विकार कर
आजकी चुनौतियोका सामना करने मे सक्षम
शिक्षाप्रणालीके विकासकी नयी नीव यह है आयुर्वेद व्यासपीठ...

शास्त्रके सिद्धांत और आज ज्ञानके क्षेत्रमे हो रहा विकास
इनके संयोजनद्वारा आजके चिकित्साजगत की
सभी चुनौतियोको स्विकार कर
अनुसंधानको सही दिशा देनेका प्रयास यह है आयुर्वेद व्यासपीठ...

चिकित्साजगतकी आजकी स्थिती
उसमे व्याप्त कुरितीयां उनके कारण से निर्माण हुआ अविश्वास और आंशंकाएं
इन सबको दूर कर इस
क्षेत्र मे पुनः सेवाभाव तथा नैतिकता जगानेका नया संकल्प
यह है आयुर्वेद व्यासपीठ...

आयुर्वेदके उत्थानके लिए
देशविदेशमे कार्यरत सभी व्यक्तीसंस्थासंगठन आंदोलन तथा उपक्रमोको
स्नेह और आत्मियताके भाव से जोडनेकी नयी पहल
यह है आयुर्वेद व्यासपीठ...

***